दिला असेल त्याने सुद्धा यावेळेस स्वतःला वेळ; कुठे काय बिघडले.
दरवेळेस मोदक, पुरण, सगळं गोड गोड खाऊन झालं असेल अजीर्ण.
१२५ पेक्षा जास्त वर्ष झाली, तोच तोच सोहळा आणि परंपरा; वाटल्या असतील त्याला जुनाट आणि जीर्ण.
गडबड, गोंगाट, ढोल ताशे, पथकं, आरत्या, मिरवणूका... आला असेल कंटाळा.
घेतली २ वर्ष सुट्टी त्याने , कुठे काय बिघडले
खड्याच्या, सुगडाच्या , राशीच्या, उभ्या, हाताच्या, बिनहाताच्या
गौरी आपल्या सोयींनी बसल्या आणि भावाबरोबर गेल्या
त्यांच्या येण्याने मांगल्य, जाण्याने प्रदूषण, कोणाच्या घरी किती दिवस मुक्काम
सगळे आपणच ठरवले, या वेळेस त्यांनी ठरवले.
घेतली २ वर्ष सुट्टी, कुठे काय बिघडले
ठेवले असेल त्यांनी सुद्धा सामाजिक भान आणि सोशल डिस्टन्स
का देव झाला म्हणून तब्येतीची काळजी घेऊ नये ?
बसला असेल एकांतात, बजबजपुरी पासून दूर,
निर्माल्याच्या दुर्गंधीपासून मास्क घालून चार हात दूर.
घेतली २ वर्ष सुट्टी, कुठे काय बिघडले
मंडपात, चौरंगावर, पाटावर बसून आल्या असतील पायाला मुंग्या.
केले असेल हातपाय पसरून घरूनच लॉगिन.
तुमच्या आमच्या टीम वर तो कायम आहे available
अजून आपण जिवंत आहोत म्हणजे त्याचे चालू आहे कि .... वर्क फ्रॉम होम.
काम तर चालू आहे, मग तर कुठे काय बिघडले.
लस घेऊन गावी जाऊन उत्सव झाले साजरे, जाता जाता गाऱ्हाणे त्याला ऐकवून कुठे काय घडले
येणाऱ्यांचे स्वागत झाले, जाणाऱ्यांचे सुतक पाळले
डॉक्टर, नर्स लोक झटले , काम करून भागले... काहींचे तर पगार अजूनही थकले
त्याच्या कामाचे त्याने आज फक्त हिशोब मांडले,
अरे, घेतली २ वर्ष सुट्टी म्हणून कुठे काय बिघडले? कुठे काय बिघडले ??
-वैभव
फक्त नावात